मोठी बातमी! पाकिस्तानने अख्खं शहरच गमावलं; ‘या’ शहराचा बलूच आर्मीने घेतला कब्जा

Pakistan News : पाकिस्तान सध्या तीन आघाड्यांवर संघर्ष करत आहे. एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तानला (Pakistan News) मार देत आहेत. तर दुसरीकडे बलुचिस्तान आर्मीच्या कारवायांनी (Balochistan) पाकिस्तानी राज्यकर्त्यांना हैराण केले आहे. अशातच पाकिस्तानला धक्का देणारी घडामोड घडली आहे. खरंतर पाकिस्तानने एक शहर गमावले आहे. बलुच आर्मीने सुराब शहरावर (Sorab City) कब्जा केला आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (Balochistan Liberation Army) प्रवक्ते जयंद बलुचने शुक्रवारी एक अधिकृत निवेदन जारी करत या घटनेची पुष्टी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की सुराब शहरावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच येथील पोलिस स्टेशनसहित अनेक सरकारी संस्थांनाना आग लावण्यात आली.
बीएलए प्रवक्ते जयंद बलुच यांनी सांगितले की शहरातील बँक, लेवी स्टेशन, पोलिस स्टेशनसह अन्य सरकारी संस्थावर नियंत्रण मिळवले आहे. क्वेटा-कराची राजमार्ग आणि सुराब गदर रोडवर तपासणी आणि गस्त घालण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी अनेक हत्यारबंद लोकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला.
दहशतवाद आणि संवाद एकत्र नाही, पीओके कधी सोडणार? शाहबाज शरीफकडून चर्चेची इच्छा, भारताचं सडेतोड उत्तर
बलुच आर्मीने शहरावर कब्जा केल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही सरकारी वाहनांना आग लावण्यात आली आहे. बीएलए कमांडर्सचा दावा आहे की शहरातील सर्व सरकारी संस्था ताब्यात घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला (Pakistan Army) हुसकावून लावले आहे. देशात इतकी मोठी घटना घडली तरी शुक्रवारी रात्रीपर्यंत पाकिस्तान सरकार किंवा अन्य यंत्रणांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.
स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
मागील काही वर्षांत बलुचिस्तानमध्ये हल्ले वाढले आहेत. मागील वर्षात तर हिंसाचाराच्या घटना अनेक पटींनी वाढल्या आहेत. मध्यंतरी बलुच बंडखोरांनी थेट जाफर एक्सप्रेसचेच अपहरण केले होते. आता एक शहर ताब्यात घेतले आहे. अशा वाढणाऱ्या घटना पाहता एक गोष्ट लक्षात येते की बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याचे नियंत्रण कमी होत चालले आहे.
आता तर बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाकिस्तानची रणनीती बलुचिस्तानमध्ये अपयशी ठरली आहे. मागील काही दिवसांत बीएलएने अनेक भागात हल्ले केले. यामध्ये फक्त पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करण्यात आले होते.